Thursday, March 19, 2009

दुबळे देव

काल आनंद यादवांची बातमी ऐकली. वारकर्‍यांची सहिष्णूता कमी झालेली दिसते.
हल्ली देव लोकांना सांभाळण्याएवजी लोकच देवाची काळजी घ्यायला लागलेत. देव का एवढे दुबळे झालेत ? कादंबरीत काही लिहिल्याने काय देवाचे मोठेपण कमी होते? बरे आज-काल सर्व धर्माच्या लोकांच्या भावना दुखावतात. असेच जर चालू राहिले तर ही वाईट सवयच लोकांना लागेल. आणि ती व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा असेल.